एक शिक्षक वर्गात बदली घेऊन आला. त्यात मोठाले दगड घालायला सुरवात केली. बदली भरली. त्याने विचारले " ही बदली भरली का ?" मुले म्हणाली "हो" मग त्याने छोटे दगड घालायला सुरवात केली. ते मोठ्या दगडांमध्ये जाऊन बसले. मग पुन्हा विचारले " आत्ता ही बदली भरली का ?"विध्यार्थ्यांच्या डोक्यात नेमके उत्तर आले. ते म्हणाले "नाही" मग त्याने वाळू घेतली. मग पाणी. हे करून झाल्यावर तो म्हणाला, " तुम्हाला काय बोध झाला ? तर दोन मोठ्या कामांच्या मध्ये जागा असते. त्यात तुम्ही छोटी कामे उरकू शकता." मग त्यांना उलट्या क्रमाने सुरवात केली. बादलीत आधी वाळू, मग छोटे दगड भरले. त्यानंतर मोठ्या दगडांना जागा उरली नाही. त्यातून काय बोध घ्यायचा ? तर तुम्ही छोटी कामेच सतत करत राहिलात, तर मोठ्या कामाना कधी वेळच मिळणार नाही.
No comments:
Post a Comment